शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांना मोक्का लावा : रघुनाथदादा शेतकरी सुकाणू समितीतर्फे सोमवारी जेल भरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:10 IST

सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत.

सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून राजकीय नेत्यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरून मोक्कांतर्गत कारवाई करावी. त्याशिवाय राजकीय नेते शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर होणार नाहीत, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली; मात्र कर्जमाफीतून शेतकºयांची पिळवणूकच अधिक होत आहे. उसाच्या एफआरपीसह दुधाचा निर्माण झालेला प्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकरी यापुढे आत्महत्या न करता, संयमाने अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहेत. त्यासाठीच सोमवारी (दि. १४ मे) संपूर्ण राज्यभरात जेल भरो आंदोलन करणार असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले.

साहेबराव कर्पे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती, तर अलीकडे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्या केली होती. यादरम्यान ७५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. मात्र, आता आत्महत्या न करता राज्यघटनेच्या कलम २१ नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. म्हणून राज्यभर शेतकरी जेल भरो करणार आहोत. या आंदोलनातून शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.भाजप, काँंग्रेस हे उद्योजकांचेच !कॉँग्रेसचे सरकार असो अथवा भाजपचे, यांना शेतकºयांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करावयाचे आहे. उद्योजकांना कमी पगारात राबणारे कामगार मिळावेत, म्हणून शेतकरी व ग्रामीण भागातील कामांसाठी, सिंचन योजनांसाठी पैसे नसल्याचे सरकार सांगत आहे. शेती सोडून शहरात लोकांनी यावे व ते उद्योजकांना कामास उपयोगी यावेत, हेच सरकारचे धोरण आहे. काँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लांसाठी, तर आताचे भाजप सरकार अंबानी, अदानी यांच्यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणPoliceपोलिस