शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नेत्यांना मोक्का लावा : रघुनाथदादा शेतकरी सुकाणू समितीतर्फे सोमवारी जेल भरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:10 IST

सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत.

सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून राजकीय नेत्यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरून मोक्कांतर्गत कारवाई करावी. त्याशिवाय राजकीय नेते शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर होणार नाहीत, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली; मात्र कर्जमाफीतून शेतकºयांची पिळवणूकच अधिक होत आहे. उसाच्या एफआरपीसह दुधाचा निर्माण झालेला प्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकरी यापुढे आत्महत्या न करता, संयमाने अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहेत. त्यासाठीच सोमवारी (दि. १४ मे) संपूर्ण राज्यभरात जेल भरो आंदोलन करणार असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले.

साहेबराव कर्पे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती, तर अलीकडे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्या केली होती. यादरम्यान ७५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. मात्र, आता आत्महत्या न करता राज्यघटनेच्या कलम २१ नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. म्हणून राज्यभर शेतकरी जेल भरो करणार आहोत. या आंदोलनातून शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.भाजप, काँंग्रेस हे उद्योजकांचेच !कॉँग्रेसचे सरकार असो अथवा भाजपचे, यांना शेतकºयांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करावयाचे आहे. उद्योजकांना कमी पगारात राबणारे कामगार मिळावेत, म्हणून शेतकरी व ग्रामीण भागातील कामांसाठी, सिंचन योजनांसाठी पैसे नसल्याचे सरकार सांगत आहे. शेती सोडून शहरात लोकांनी यावे व ते उद्योजकांना कामास उपयोगी यावेत, हेच सरकारचे धोरण आहे. काँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लांसाठी, तर आताचे भाजप सरकार अंबानी, अदानी यांच्यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणPoliceपोलिस